आम्ही अंधारात, तर आता तुम्हीही राहा अंधारातच… | Ravikant Tupkar | MSEB | Farmer | Sarakarnama

Sarkarnama 2021-06-12

Views 0

नागपूर - महावितरणने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणे सुरू केले आहे. यामुळे संतप्त झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर चांगलेच खवळले. त्यांनी वीज वितरणच्या मुख्य कार्यालयाचीच वीज कापून टाकली. नाहक शेतकऱ्यांना त्रास देणारी महावितरण शॉक दिल्याशिवाय सुधरणार नाही, असे म्हणत तुपकरांनी अधीक्षक अभियंत्यांना घेराव केला आहे. आजच्या आज कापलेले वीज कनेक्शन जोडण्याची त्यांची मागणी आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची वीज पूर्ववत सुरू करणार नाही, तोपर्यंत अभियंत्यांना येथून जाऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांचे हे आंदोलन आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS