पहलगाम हल्ल्याविरोधात मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी केलं काळ्या फिती बांधून नमाज पठण

ETVBHARAT 2025-04-25

Views 9

सोलापूर : पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. सोलापुरातील मुख्य मशिदींमध्ये मुस्लिम बांधवानी काळ्या फिती बांधून नमाज पठण केलं. एमआयएम पक्षाच्या वतीनं "काळ्या फिती बांधून नमाज अदा करावी," असं आवाहन करण्यात आलं होतं. "भारताच्या संरक्षणासाठी मुस्लिम बांधवानी प्रार्थना केली. दहशतवाद्यांना जात नसते, त्याला राजकीय रंग देऊ नका. देशात भाईचारा राहावा, भारतात हिंदू-मुस्लिम वाद नको. हा आतंकवादी हल्ला होता, यावर राजकारण करत बसण्याऐवजी याला प्रतिउत्तर देणं महत्वाचं आहे. मुंबईत 26/11 हल्ला झाला, त्यावेळी अनेक मुस्लिम लोकांनी प्राण गमावला होता. आतंकवाद्यांना जात नसते, त्यांना फक्त दहशत निर्माण करायची असते," अशी प्रतिक्रिया एमआयएमचे पदाधिकारी शौकत पठाण यांनी दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS